बातम्या

40 च्या बदल्यात 40000 पाहिजेत : आमदार जितेंद्र आव्हाड

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले असून, पाकीस्तानला धडा शिकवा; 40च्या बदल्यात 40000 पाहिजेत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची ताकद मिळायला हवी. पाकीस्तानला याची जबरदस्त किंमत मोजायला लावली पाहिजे. अशावेळी राजकारण बाजूला ठेवायला पाहिजे. आपल्या चुकलेल्या धोरणांमुळे हे घडत असेल तर ही धोरणे सुधारण्याची गरज असल्याचे मतही यावेळी आव्हाड यांनी व्यक्त केले.

काश्मीरचा तरूण जर मुख्य प्रवाहातून बाहेर पडत असेल तर त्याला पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे हे आपले काम आहे आणि आपण सर्व भारतीयांनी मिळून ते काम राजकारण बाजूला ठेऊन करायला हवे. सर्व राजकारण्यांनी एकत्रित येऊन ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असेही ते म्हणाले.

Web Title: Jitendra Awhad Comment On Pulwama Attack

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT